Wednesday, February 4, 2026

साल नया है


 जश्न चल रहा यहाँ वहाँ,लो आता साल नया है

सोच रहीअसमंजस में क्या,सच में कुछ बदला है 


फैले है दहशत के लम्हें ,  आँखो में खून भरा है 

अम्मा का संदूक  खुला है, प्यार मगर बदला है 


दुष्ट खड़ा है सीना ताने,, बेेटी डरी हुई है 

काले सिक्को की खन-खन से, सत्य न्याय बदला है 

 

 आर्त की चीखों से  धरती,हर दिन दहल रही  है 

तारीकी की चादर ओढ़े,  शहर मेरा बदला है 


 धुंध छंट रही हौले-हौले, ,भोर उजास खिली है 

फटी शर्ट-निकर में बच्चे, गाँव कहाँ बदला है 


तम को काट रहा है भानु,, प्राची में उतर रहा है

हाय गुम गई मानवताबस, कैलेंडर  बदला है

 

©नयना (आरती) कानिटकर


Friday, May 16, 2025

"साखळी "

 "साखळी "

भाग्यवान समजायची ती स्वतःला
मिळाला होता सहवास तिला
दोंन्ही कडील आज्यांचा
त्या दोघी ही
त्याकाळी धर्मभीरू कधीच नव्हत्या
एक होती
जन्मतात सुरेख साच्यात घडलेली,
तर दुसरी होती कष्ट करून दणकट अंग मिळवलेली
तिच्या लहानपणी
एक सांगायची गोष्ट रात्री झोपतांना
राजा-राणी ची
एक होता राजा, त्याला दोन राण्या होत्या
एक आवडती , एक नावडती..
तर दुसरी सांगायची
महिषासुर मर्दिनी ची कथा
त्या कथांचे बीज पण रोवले गेले होते
डी.एन.ए मधून
पुढच्या पिढीत , काही से तसेच तर काही से बदलून
मग
ते ! सांगायचे त्यांच्या व्यस्ततेतून ही
अधे मधे
राणी दुर्गावती ची कथा , तर कधी शिवाजींचे हल्लेबोल
पण
तिने ! मात्र कथा सांगायची सोडूनच दिली
ती स्वतः शी झगडत राहिली
आवडती -नावडती राणी घ्या कथेत
आपले स्व टिकवायला
ते जीन्स परत
काही से बदलून
तर काही से तसेच
छापील झाल्या सारखे उतरले तिच्यात
आता तिची पिढ़ी झगडते आहे भ्रमिता सारखी
त्या डी.एन.ए च्या साखळी शी
कारण
महिषासुरमर्दिनी व राणी दुर्गावती चा डी.एन.ए
शंभर टक्क्याने वरचढ़़ ठरला आहे तिच्या पिढ़ित
पुढच्या पिढ़ीत मात्र
तिने रोवले आहे
स्वतंत्र अस्तित्वाचे बीज
बघू यात आता डी.एन.ए ची साखली
कुठले वळण घेते
©नयना (आरती)कानिटकर

Tuesday, August 25, 2020

*आंबट -गोड आठवणी* 

आजी आणि तारापुंज

लहान पणा पासून आम्ही आजीच्या खूप जवळ असू म्हणजे आजी शिवाय आमचे पान हालायाचे नाही. आजी काही शाळेत जाऊन तर शिकलेली नव्हती पण आजूबाजूशी चौकस बुद्धी व वाचनाची आवड .सदा काही ना काही करत असे . चौदा मुलांचा संसार खूप काटकसरी ने पाळला . कुठली ही वस्तू वाया जाऊ द्यायची नाही हा तिचा कटाक्ष . मातीच्या चुली पार ती फारच सुंदर घडवत असे आणि  लहान लहान चुली आमच्या कडून ही घडवून घेत.
जुलै -अगस्त मध्ये आमच्या कडे भूट्याचा किस होत असे.  मध्य प्रदेश च्या माळवा प्रांतात हा घरो-घरी केला जातो.
भुट्टे किसून झाल्यावर आतला कडक भाग ज्याला "माखोले" म्हणतात ते आजी वाळवून ठेवे.  तेच माखोले छोट्या चुलीत पेटवून ती आम्हाला रोज सकाळी चहा करून देई .
त्या काळी आमचे घर  भाड्याचे छोटे से . एक स्वयंपाकघर व एक खोली वरच्या भागात व खाली दोन छोट्या खोल्या. ती आम्हा  दोघी बहिणींना घेऊन  खालच्या खोलीत झोपत असे. तिला बिछान्या वर स्वच्छ पांढरी चादर लागे  फाटकी असली तर ती त्याला टिपण घाले पण नवीन चादरी चा आग्रह नसे . अशी साधी शी माझी आजी खूप काही गुणांनी नटलेली.
आकाशातले तारे ती अचूक ओळखायची .आम्हाला ही शिकवत असे "हे सप्तऋषी , हा धुवतारा सदा उत्तरे कडे उगवणारा. हे नक्षत्रांचे गुच्छ . सप्तर्षी तारकासमुहातील प्रमुख सात प्रमुख तार्‍यांपैकी पहिल्या दोन तार्‍यांना जोडून सरळ रेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवतार्‍याकडे जाईल.मृग तारकासमुहामध्ये असलेले मृगाचे तोंड नेहमीच उत्तर दिशा दर्शविते. सिंह तारकासमुहामध्ये असलेले सिंहाचे तोंड नेहमीच पश्चिम दिशा दर्शविते. असे अनेक प्रकार ती सांगत असे -शिकवत असे .

एकदा काय झाले आमच्या घरचे अलार्म घड्याळ बंद पडले. छोटे गावं लौकर सुधारून मिळाले नाही.  आम्हाला सकाळी अभ्यासाला उठवणे,चहा करून देणे हा तिचा रोजच्या  उपक्रमात खंड पडला नाही . आमच्या घरा  समोर एक बोरी चे झाड होते ती तिची खूण त्यावर येणारे तारे बघून ती अचूक वेळ सांगे त्यामुळे आमची दिनचर्या काही बदलली नाही . तिचे वय साधारण ७५-७६ असणार नजर कमजोर झाली होती पण चष्मा लावायला तयार नव्हती .
एकदा नजर चुकीने तिनी बोरा वरचे तारपुंज बघून आम्हाला अभ्यासाला उठवले."उठा लेकींनो चार वाजून गेलेत .तास -दीड तास अभ्यास होईल. उठा लवकर . त्या दिवशी मी पहिल्यांदा उठाचा कंटाळा केला होता . तर डोक्यावर हात फिरवत म्हणे उठ बेटा दहा दिवसावर परीक्षा आली. आम्ही दोघी बहिणी उठून वर सांगितल्या प्रमाणे आजी ने मखोळे जाळून आमच्या करता चहा करून ठेवला होता तो प्यायलो व अभ्यासाला बसलो. ती आमच्या जवळ बसून काही ना काही शिवत असे . झालर लावलेल्या पिशव्या सदा नाव-नवीन तयार करत असे. त्यावेळे प्लास्टिक बैग्स कुठे होत्या . 
अभ्यास करत दोन तास व्हायला आले तरी दिवस काही उजाडे ना. आम्हाला ही कंटाळा यायला लागला म्हणता आजी ने चुलीवर तापवलेले पाणी घेऊन आंघोळी पण करून झल्या पण सूर्य काही उगवेना.
बाबांना आमच्या खटपटी मुळे जाग आली. ते वरच्या माडी वरून खाली आले ,त्यांना वाटले कोणाची तरी तब्बेत बिघडली बहुतेक .खाली येऊन बघतात तर आम्ही शाळे करता तैयार . आमचे बाबा त्याच्या आईला म्हणजे आजी ला वहिनी म्हणत असे .
"अग !वहिनी अजून तर फक्त चार वाजलेत .अग! इतक्या लौकर तयार केलास  मुलिंना ."
आजी एकदम ओशाळल्यागत झाली .अरे! बहुतेक मीच चुकले आज ते रोहिणी नक्षत्र बोरी वर दिसले...मला वाटले चार वाजलेत . म्हणजे आम्ही रात्री चे एक-दीड लाच उठलो असणार . "जा बाबू! तू जाऊन झोप मी बघते .परत उठवते साढे  सहाला " आम्हाला जवळ घेत म्हणाली .
आम्ही तिघी झोपी गेलो .मग तर मज्जाच झाली जी झोप लागली ती सरळ आठ ला उघडली. तेही बाबांनी परत दार ठोठावल्यावर . एरवी साडे पांच ला जोरात रेडियो लावून उठवणारे आज उबरठ्या वर हंसत बसले होते .
आमची त्या दिवशी ची शाळा चुकली पण मग आजी च्या हाताची शेगडी वरची गरम-गरम पोळी त्यावर तूप -पिठी साखर खालून जी खाल्ली त्याची  चव आजचे कुठलेसे पदार्थ देऊ शकत नाही.
अश्या माझ्या आजी सोबतच्या खूप गोड-गोड आठवडी तिला जाऊन जवळ-जवळ चाळीस वर्षे झाली तरी नजरे समोर तश्याच. 
©नयना (आरती ) कानिटकर 

Thursday, July 28, 2016

आजी ची आठवण

माझी आजी


पहूडले होते थकून-भागून
अपरान्ह समयी
लगेच डोळा लागला बहूदास्वप्नात कदाचित,
मी गेले असेन बालवयात,
तरंगले ते सारे दृष्य,जेंव्हा
मी आणायची धूण धुवू
विहीरी वरुन, तिच्या
नऊवारी लुगड्या सह
वाळत घालायचे उँच दोरी वर
दांडी ने सारत
 गोळा भरायचा  माझ्या
बारक्या  दंडात
ती बघत असायची गूप-चूप
माझे श्रम, आणि
आईने दिलेल्या दुस-या चहातले
दोन घोट चुपचाप राखायची
माझ्या करिता
पदरा आड लपवून, आईच्या नकळत
फ़िरवायची पाठी वरुन
हात प्रेमाने...
अचानक हाक ऐकू आली
आईsss काय ग! किती दमलिस
कशाला ग! काढतेस ढिग भर  कामे,
हे घे! दोन घोट चहा पी
केलाय मी, आल घालून
पाठी वर हात फिरवत
चहाचा कप पूढे केला लेकी ने
तिच्या चेह-यात चक्क आजीच दिसली
आनंदाश्रू येऊन ठाकले,
माझ्या गालांवर
खरंच
मृत्यु होतो तो शरीरांचा
आठवणी जीवंत असतात
पिढ्यांन  पिढ्या

नयना(आरती) कानिटकर
२८/०७/२०१६



Friday, January 29, 2016

अनुवाद - मिलाकात की उम्र

आपण ओळखत नाहीं
एक दुस~याला, तरी
हवेचा गंध दरवळतो
एक विशिष्ठ गंधा ने
तुझ्या स्पर्शा ने
उमलतात गुलमोहर, पण
माझ्या जवळ येताच
पाकळ्या पडतात मोकळ्या
आपण प्रेमी नाहीं
ना कधी स्वप्नात ही एकमेकांच्या
आपण भेटलो ही नाहीं,आश्या ठिकाणी
जिथे फक्त शांतता
आणी उफ़ाण प्रेमाच्या लाटांची
चंद्र कधीच डोकावला नाहीं
तुझ्या नी माझ्या मनात
चकोरा सारखे प्रेमगीत ही
नाही,गायले कधी
तुझी-माझी काया उभी आहे
अमोरा-समोर गरजे प्रमाणे
उत्तेजनाच्या सर्वोच्च बिंदू वर
एक घंटी धोक्याची
झंकारुन परतायचे नेहमी
विसरुन जायला एक दूस~या सवे
प्रत्येक भेटी नंतर
आयुष्याच्या उत्तरार्धा प्रमाणे
----मूळ कविता प्रदीप मिश्र    
अनुवाद-नयना(आरती)कानिटकर


Friday, January 8, 2016

भरारी

म्हणूदेत कोणाला
काही  ही  कि ,तो
दगा आहे
आहे लबाडी
तू फसवणूक करुन उडतोय
पण असू देत
हलव तो पिंजरा
दे ती डाळिंबी उडवून
त्या सोन्याच्या वाटितली
असू देत
तो ताप रवि चा  किंवा  तेज वारा
तू! उड
तू! घे भरारी माझ्या राघू

नयना(आरती) कानिटकर
०८/०१/२०१६

Friday, January 1, 2016

स्त्री

 येते माझ्या स्वप्नात
ती सतत रडणारी
मनातल्या मनात
थरथरणारी वात जशी
येते माझ्या पर्यंत ,उपाशी
कंटाळलेली,उपेक्षित
तिचे ते हुंदके
माझ्या ही घश्यात जा-ये करतात
पण मी नाही उतरवू शकलो
ते हुंदक्यांचे शब्द
 कवितेत
कुठला ही अनुवाद पण नाही घडला
तिच्या स्तब्ध डोळ्याततून
उमटत नाहीं
प्रेम-प्रणयांचे दृश्य
असंख्य दरवाज्यातून कडेकोट बंद आहे
तिच्या दु:खाचे गाठोडे
आपल्या चहूँ कडे असंख्य भिंति उभ्या केल्यात  तिन
तिचे रडणे फ़क्त स्वप्नातच
मला आवडेल ते आवरायला
तिचे हुंदके,पुसायला अश्रु
काढायचे आहे पडद्याच्या बाहेर
आप्ले रडू आवरणारी ती
जर भेटली मला दिवसा कधी,तर
कसे ओळखु  मी तिला
जी दिवसा करते फक्त याचना
व्रत,उपवास आणी प्रार्थने ने
कुठेच का तिचा नैवेद्य स्वीकार्य होत नही
मग अचानक अदृश्य होते ती
माझ्या स्वप्नातून
भूक व वेदना झोपवतात तिला अन
मला ही ,सकाळ्च्या थंड हवेत
थबकलेले तिचे अश्रु
पक्ष्यांची चिव-चिव
तीचे रुदन गीत
आकाशात आकरले जाते जणू
मी स्तब्ध ऐकत बसतो  जसे
पृथ्वी चा हाहाकार.

Friday, December 11, 2015

"नको रहाणे"

नको रहाणे अशा ह्या जगी.

पडताच थेंब  पाण्याचा
कागद हा जणू विरघळणारा

संसार आहे  कूंपण काट्यांचे
अडकता क्षणी मरणारा

संसाराचे क्षण-क्षण चटक्यांचे
आग पेटता हा संपणारा

सांगून गेले संत कबीर हो
नाम सतगुरु हाच तारणारा

नयना(आरती) कानिटकर
११/१२/२०१५

Wednesday, September 2, 2015

चि.------
अ.उ.आशिर्वाद
  तुझा  राखी निमित्य येण्याचामेल मिळाला होता .खूप आनंद वाटला की नुसते फोन वर वरपांगी आमंत्रण देण्या पेक्षा तु मला मेल केली,हे पण पत्राच स्वरुप नाही का :) ,थोड व्यावसायिक असुदेत पण लगेच पोहोचण्याची हमी  भरणार.असो.
     काही पारिवारिक व व्यवसायिक जिम्मेवारी मुळे मला येणे अशक्य  होते पण क्षणो-क्षणी आपली लहानपणी साजरी झालेली ती पहिली  राखी आठवत राहिली.तुझ्यात नी माझ्यात ७ वर्षाचे अंतर,तुझा जन्म मार्च मधला व राखी आगस्ट मधे आली .तु जेम-तेम ४ महिन्याचा असावा. बाबांनी आम्हाला म्हण्जे मला व माईला चाँदी ची राखी आणुन दिली होती तुला बांधायला.आई-आजी ने नारळ खवून वड्या व नारळी भात केला होता.
  आम्ही पण हातावर मेंदी चे ५ ठिपके लावून ,नवीन फ्राक ,पायात पैजण घालुन छूम-छूम करत घरभर नुसते मटकत फिरत होतो.
  आणी तो क्षण आला ज्याची वाट बघत होतो.आई ओवाळायचे तबक, राखी,नारळ घेऊन आली .तेवढ्यात माई ने ह्ट्ट केला मी आधी राखी बांधणार म्हणून.मग मी पण राखी बांधली.ओवाळणी म्हणून त्या वेळेत चलनात असलेल्या चौड्या पट्याच्या सैटिन रीबिन आई ने तुझ्या हातात दिल्या अम्हास द्यायला. तेव्हा दोन वेण्या घालण्याचे चलन होते.कैड्बरी वैगैरे सुद्धा माहित नव्हते.तू आंनदाने त्यच्याशिच खेळाला लागला आम्हास देईना.मग आजी मे मनवून तुझ्या कडून ती ओवाळणी दिली.
  आम्ही सुद्धा लगेच रीबिनी वेण्यांना बांधून तुझ्या नाकाशी त्यांची बांधलेली फुले गुळ्गुळ करत होते व तु खिदळून हसत होता.तो आनंद आई-बाबा व आजी च्या चेहरयावर खूलुन दिसत होता वर्ष लोटायला लागली,
 मग आई ने शिकवलेली राखी स्वत: करुन तुला बांधायला लागलो.ओवाळणी पण बदलत गेली पण चाकलेट मात्र तेव्हा ही नाही आले.
       कालांतराने  प्राथमिकता बदलल्या.पण सणाचा गोडवा तोच राहिला.आता मात्र दूर-दूर असल्याने नुसत्या आठवणी.
  आई-बाबांना पण ते दिवस आठवले की मन भरून येत असेल.असो पण तु व वहिनी त्यांचा सांभाळ उत्तम रित्या करल असल्याने आम्हाला काही काळजी नाहिच.खरे तर हिच आमची ओवाळणी पण वहिनी मात्र सगळ्या रिती-भाती संभाळते तिचे कौतुक वाखण्या जोगे आहे.लिण्यास खूब आठवणी आहेत पण आता पूर्णविराम.हेच पत्री ति.आई-बाबांना शि.शा.न. व दोघे लहानास आशिर्वाद.
तुझी ताई
-----------


Friday, August 14, 2015

मला भारत देशाचा नागरिक असल्यचा अभिमान आहे

  ''मला भारत देशाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटतो / अभिमान नाही वाटत''
विषयांवर लिहिण्या आधी मी भारतीय आहे व भारतीय संविधान अनुसरूनच माझे आचरण असेल अशी मी प्रतिज्ञा करते,
कारण लिहिण्याचे-बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले  म्हणून त्याचा दूरूपयोग माझ्या भाषेतुन होऊ नये.कान सरळ हाताने पण  धरता येतो व मानेच्या मागुन हाथ नेऊन सुद्धा.------

माझा जन्म स्वातंत्र्याच्या  नंतरचा. म्हणजे एक प्रकारे स्वातंत्र्य माझ्या ताटात पकवान्ना प्रमाणे वाढले गेले,नुसते मला नव्हे तर माझ्या पिढीच्या लोकांना सुद्धा.पण त्या मागचे कष्ट ,बलिदान ह्यापिढी ने भोगले नसल्याने त्यांनी स्वातंत्र्य गृहितच धरले.असे मला वाटते.
साध्या दोन घासाच्या जेवणा करिता होणारे हजारो कष्ट मी माझ्या आजी कडून एकले आहे.ती सदा आम्हा बजावत असे पानात अन्न टाकू नका .मिठ सांडू नका नाही तर डोळ्याच्या पापणिने उचलावे लागेल,त्यावरुन कल्पना येते की आजच्या दृष्टि ने त्या कळात साध्या मिठा करिता सुद्धा बाईला किती झगडावे लागले असणार. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे भारतिय स्त्री ने सुद्धा स्वातंत्र्य प्राप्तित मोलाचे योगदान केलेले आढळते.रमाबाई रानडे,सावित्री बाई फुले ह्यांनी तर प्रत्यक्ष पणे लढा लढविला पण आपल्या कुटुंबियांचा भार आपल्या खांद्यावर घेऊन पती-पुत्र ह्यांना देशा करिता मोकळे ठेवण्यांरा स्त्रीयांनी पण अप्रत्यक्ष पणे  जास्त मोलाचे योगदान केले आहे त्यांची यादी  आपण करु शकत नाही.
अश्या पूर्वज स्त्रीयांचा  अनमोल वारसा ज्या राष्ट्रा कडून मला मिळाला त्या राष्ट्राचा मला अभिमान तर आहेच ,मी त्यांची ऋणी सुद्धा आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर च्या काळात भारतातील स्त्रीया देशाचा विकास घडविण्यात हातभार लावत आहेत.साधी आकडेवारी पाहिली तर असे दिसते की भारतातील सर्वसामन्य स्त्रीया बालवाडी,अंगणवाडी,प्राथमिक शिक्षण,परिचारिका,सफाईकामगार,शेतमजूर विणकर अश्या वेगवेगळ्या कामामध्ये तर हातभार लावतच आहे,त्या पलिकडे पूर्वि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या सैन्य शाखेत पण प्रवेश केला आहे.संगणक,व्यवस्थापन आदी क्षेत्रे  पण त्या हाताळत आहे.
 परंतु आता गरज आहे स्त्रीयांनी सार्वजनिक जीवनात निर्भयपणे पाउल टाकण्याची.स्त्रीयांना स्वतंत्रतेचा भरपूर वाव मिळाला पाहिजे,मिळत ही आहे .हळू-हळू त्या आपल्या लेखणीतून स्त्रीप्रश्न ,समाजप्रश्न मांडू ही लागल्या आहे पण राजनीतिक क्षेत्रात मात्र अजून मागे आहे.
आपल्याकडे भरपूर कौशल्य आणी भरपूर चिवटपणा गेली अनेक दशके जगून-तगून राहताना स्त्रीयांच्या अंगी असतेच म्हणजे असे कि इंग्लैड,अमेरिकेतील स्त्रीया थोडा जरी त्यांच्या दिनक्रमात बदल झाला तर त्यांना जड-तोड करणे कठिण जाते,परंतु भारतिय स्त्रीया जडतोड करतच जगत असतात आणि त्यातूनच त्यांच्या मध्ये एक व्यवहारिक हुशारी व ताकद आली आहे,त्या मोठी कामगिरी बजावू लागल्या आहे
पण त्यासाठी मिळणारया संधी, सोई अजुन  ही अपूरया आहे.
 स्वातंत्र्य प्राप्तिचा एव्हडा काळ लोटल्यावर ही अजुन हव्या त्या सोई ,नियम-कानून स्त्री करिता आले नाही ह्याची खंत वाटते.त्या घरा बाहेर निघाल्या,मिळवत्या झाल्या पण स्वातंत्र्य तेव्हडच मिळाले की ज्या मुळे पितृसत्तेचे सिंहासन हलता उपयोगी नाही.मानसिक  स्वातंत्र्य मिळाल्या शिवाय अजुन ही स्त्री परतंत्र आहे.
* हुंड्या करिता हुंडा निषेध अधिनियम,विवाहित महिला सपंत्ति अधिनियम जरी आले असले तरी ते अजुन अपुरे आहेत.
स्वातंत्र्याचे खरे स्वरुप स्त्री स्वातंत्र्यानेच अधिक खुलून येईल त्या साठी योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सौ.नयना(आरती) कानिटकर


Sunday, January 25, 2015

आज कित्येक दिंवसांनी पुन्हा भेटलास आणि

हळूच दिवा उजळला आशेचा
उमलल्या कळ्या मोगरयाच्या
दरवळला वारा पारिजाताचा
बहरला रंग  सुगंध बकुळीचा
आज कित्येक दिंवसांनी पुन्हा भेटलास आणि

अनुभवली
 ती मंद-मंद वारयाची झुळूक
तो उन्मुक्त समुद्री किनारा
तो उगवता तेजपुंज सुर्याचा
बेभान होऊन ओंजळित भरले क्षण
आज कित्येक दिंवसांनी पुन्हा भेटलास आणि

आठवला
उगवता तो चंद्र पोर्णिमेचा
ते संग पसरलेले तारा पुंज
तो अडिग ध्रुव तारा उत्तरे कडचा
हात एक दुसरयातघट्ट मिटलेला
आज कित्येक दिंवसांनी पुन्हा भेटलास आणि

चल घेऊ
सोडून ते बंध व्यवसायाचे
होऊन स्वच्छंद,मुक्त श्वसनाचे
लुटू स्मित हास्य जीवनाचे
टिपू ते कण-कण आंनदाचे
आज कित्येक दिंवसांनी पुन्हा भेटलास आणि

नयना(आरती) कानिटकर
११/११/२०१४

Tuesday, September 30, 2014

अनुवाद

कविता एक - अनुवाद अनेक - भाग ३२ माझा सहभाग :
केलेच तु आपल्या
मना सारखे शेवटी

आळा घातलाच ना
माझ्या शब्दांना
की, ते आता
व्यक्त होणे अशक्य झाले

उडवूनच लावले सगळे
बोलणे,हट्ट,रुसवे
खदखदणारया भाताच्या
वाफे सारखे

तिला सदा गृहितच धरले
किती दिवस देणार
ती,आरोळी
शेवटी प्रामाणिक ती

तरी ही तू
तटस्थता
स्वैर आनंद
लोटू,नाकारु शकत नाही

मूल कविता:-- अपर्णा अनेकवर्णा
अनुवाद:-नयना(आरती)कानिटकर

जख्मा भरतात सगळ्या

शारीरिक पातळी वर
किती घाव केला तरी
भळभळून रक्त सांडले जरी
नियती आपले चक्र चालवते
हळू-ह्ळू नवीन कातडे उमलते
तश्या
जख्मा भरतातच सगळ्या?

मानसिक पातळी वर
झाला शब्दांचा वार जरी
शब्द टो्चले किती तरी
विचार आपले चक्र चालवते
हळू-हळू शब्दांचे कोंदण उघडते
तश्या
जख्मा भरतातच सगळ्या?

ह्रदयात जेंव्हा उतरती नश्तर
ते खोलवर जाऊन भिडतात
मन ते मेंदु पोखरुन काढतात
प्रयत्नाचा चक्र चालविला जरी
हृदयी घाव ना विरघळते
तश्या
जख्मा भरतातच सगळ्या?


Monday, January 13, 2014

कळ्सुत्रि बाहुली

कळ्सुत्रि बाहुली

आले मी जगात जेव्हा
खूप कोवळे होते तन-मन माझे
निसर्ग सम्मत दोर-नाळ
सहज गती तुझ्या हतात होती
हळू-हळू मी बागडु लागले
नाचले तुझ्या अंगणात
खूप धागे जोडले गेले मग मला
नात्यांचे, नियमांचे,संस्कारांचे
तरी तुझ्या दोरीला घट्ट धरून
आनंदाने हसत-खिदळत
बहरत होते मी वेली सारखी
अचानक अलगद ती दोर
तु नव्याने सोपविली नवीन हतात
मग अजुन धागे जोडले गेले
मी बहरत राहिले अंगणातून मासघरात
आनंदाने हसत-खिदळत
तुझा धागा अता सैल झाला
पण अजुन स्वत:
जोडलेल्या धाग्या संग
माझे नृत्य अविरत चालु राहिल
कधी अंगणात, कधी मासघरात
शेवटी परसदारात सुद्धा
एका कळसुत्री बाहुली प्रमाणे
कदाचित आनंदाने हसत-खिदळत

नयना(आरती) कानिटकर
१३/०१/२०१४







Tuesday, July 30, 2013

नदी किनारी काठा वरती
स्वच्छंद पणे बसावे
डोह डोलती पाण्या मधले
बघत मन आनंदित व्हावे

मंद हवेच्या झुळूकि संगे
सुगंध फुलांचा घ्यावा
मन प्रफुल्लित गंधा संगे
वेळ मस्त घालवावा

आकाशातुन पक्षी चहू कडे
चिच-चिव करत यावे
तसे उडत-उडत पुन्हा ते
आकाशातच समावे

मित्रां संगे  मुक्त  होऊनी
चिंता कष्ट सरावे
हातात हात घेऊनी सारे
सस्नेह मस्त जगावे

नयना (आरती) कानिटकर

Tuesday, November 27, 2012

आपण ठरवायचे"

आपण कसे जगायचे
हसत खिदळत का,नाक मुरडत
आपले आपणच ठरवायचे

चिंता दुख: किती उगाळायचे
उद्याच्या चिंतेत आज का मरायचे
आपले आपणच ठरवायचे

आयुष्यात सुख-दुख: हे यायचेच
दुखात ही सुख कसे मनायचे
आपले आपणच ठरवायचे

मानवेतर प्राणी ही जगत असतात
पण आपण स्वाभिमानाने कसे जगायचे
आपले आपणच ठरवायचे

प्रेम जिव्हाळा नाती-गोती
यात आपण किती अडकायचे
आपले आपणच ठरवायचे

Thursday, September 27, 2012

आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

तुझे स्वप्न आकाशाच्या पलिकडे वाहु दे
प्रयत्नाना कुठे ही कमी पणा नसू दे
कंबर कसुन मेहनती चा कल असू दे
स्मितहास्य चेहरयावर सदा बसू दे
आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

अभ्यासात उत्तुंग शिखर गाठण्याचा प्रयत्न असू दे
व्यवहारात असमानतेचा सल नसू दे
व्यवस्थापनाची पुर्णपणे जिजिविषा असू दे
आत्म सम्मानाचा तुझ्या कडे अभिमान असू दे
आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

बाल्यावस्थेतून युवावस्थे कडे पदार्पण होऊ दे
बाहेर वावरताना अधिरपणा अजिबात नसू दे
स्वभावात चारित्र्याचे श्रेष्ठबळ असू दे
विचारात संस्कारांचा निष्णात जोर असू दे
आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

अर्थिक जिजिविषेत सदा समाधान असू दे
पैसा अडक्यांची मुळीच गुर्मी नसू दे
खर्चा बरोबर बचतीचा प्रयत्न असू दे
अचल संपत्ति वर तब्याचा कल असू दे
आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

सगळ्यांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न असू दे
खांदयावर  हाथ ठेऊन बोलण्याचा अधिकार कोणा नसू दे
समाजात वावरताना शब्दावली गोड असू दे
स्वश्रेष्ठतेच्या जबाबदारीची जाणीव असू दे
आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

Monday, July 16, 2012

नव नवीन नित शोधू

नव नवीन नित शोधू
कधी उमलू,बहरू,कोमेजू
फांदीवर वेली शब्दांच्या
आपूलकिने बोलू!!!!!!!
                                 अनुभवले क्षण आनंदाचे
                                 भरभरुन ओसंडून वाहू
                                 मैफिलीत खुल्या गप्पांच्या
                                 आपूलकिने बोलू!!!!!!!
पोटलितील सुख दु:खाचे
अतित आंनदाने वाहू
पायवाट जशी शब्दाची
आपूलकिने बोलू!!!!!!!
                                  क्षण अनमोल जीवनाचे
                                   निसटते हातातून वाळू
                                  मनमोकळे पणाने अन
                                   आपूलकिने बोलू!!!!!!!
नतमस्तक मी आयुष्याशी
ध्येय शिखराचे ठेवू
शब्दकोश विनयचा अन
 आपूलकिने बोलू!!!!!!!                                

Tuesday, August 23, 2011

फूला भोवती काँटे खूप
पण सुगंधि फूलाचा वास दे
सरले ढग सगळे जरी
मंद पावसाचा मृदु वास दे
तुझा प्रेमळ साथ दे
उजाडत्या पोर्णिमे मधे
हातात मझ्या हात दे
मावळ्ता चंद्र असला तरी
जीवना चा नाद दे
तुझा प्रेमळ साथ दे
कवितेच्या वाटेवर मला
तुझा आनंदा चा साथ दे
हातात मझ्या हात दे

Monday, April 18, 2011

आई ला अर्पण

जीवनाच्या या क्षणाला
मी फक्त ’मीच’ असावे
नको तो शिक्कामोर्बत
नांव किंवा अण्णावाचां
नको तो जात-पात वा धर्माचा
नको अता ते दिर्घ-र्ह्स्व
आता फक्त ’मीच’ असावे
नको अता ती आई वा
पत्नी च्या कर्तव्या ची धांव
नको अता ते ऋणानुबंध
नको ती संपत्ति व माया
साठीच्या घरात पाऊल ठेवता
मी फक्त ’मीच’ असावे
खूप अनुभवले सुखाचे क्षण
कष्ट आणी कामाचे पण
जगता आगळे आयुष्याचे क्षण
मी फक्त ’मीच’ असावे